IPL 2021: राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालच्या अर्धशतकी खेळीनंतर एम एस धोनीने केलं असं, चाहत्यांनाही वाटले कुतूहल
यशस्वी जयस्वाल (Photo Credit: Twitter/IPL)

राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals ) सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने (Yassvi Jaiswalशनिवारी आयपीएल  2021 चे तिसरे सर्वात वेगवान अर्धशतक ठोकले. कारण त्याने अबू धाबीच्या (Abu Dhabi) शेख जायद स्टेडियमवर महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) सामना करताना त्याच्या अर्धशतकापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त 19 चेंडू घेतले होते. राजस्थानने सहजपणे सात विकेट आणि 15 चेंडू राखून 190 धावांचा पाठलाग केला. कारण शिवम दुबेने यशस्वीसह अनुक्रमे 64 आणि 50 धावा केल्या. सामन्यानंतर त्याने एका व्हिडीओ संवादात सांगितले की, CSK कर्णधार एमएस धोनीच्या बॅटवर त्याची स्वाक्षरी मिळाल्याने खूप आनंद झाला आहे.

मी प्रथम विकेट बघण्याचा विचार करत होतो. आम्ही 190 चा पाठलाग करत होतो. मला माहित होते की विकेट चांगली असावी. मी फक्त चेंडूचे भांडवल करून माझ्या संघाला चांगली सुरुवात देण्याकडे पाहत होतो. जेणेकरून आम्ही 190 धावांचा पाठलाग करू शकू, असे जयस्वाल यांनी iplt20.com वर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये टीमचे सहकारी अनुज रावत आणि शिवम दुबे यांना सांगितले.  सामन्यानंतर मी माझ्या बॅटवर एमएस धोनीची सही घेतली, मी खरोखर आनंदी आहे, असे तो पुढे म्हणाला. हेही वाचा IPL 2021 Purple Cap Updated: पर्पल कॅपची शर्यत रंगतदार स्थितीत, गोलंदाज लावत आहे जोर पण हर्षल पटेलने मजबुतीने काबीज केले नंबर वन चे सिंहासन

दुबे म्हणाला जेव्हा मी तिथे फलंदाजीसाठी गेलो होतो. तेव्हा आम्ही अव्वलस्थानी होतो आणि मी फक्त माझा नैसर्गिक खेळ खेळण्यावर भर देत होतो. जेणेकरून आम्ही एकूण धावांचा पाठलाग करू शकू. या विजयाचा अर्थ असा आहे की राजस्थानचे आता 12 सामन्यात दहा गुण आहेत आणि मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे ज्यात दहा गुणांवर चार संघ आहेत. राजस्थान रॉयल्सचा पुढील सामना मंगळवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध शारजाह क्रिकेट स्टेडियमवर होईल.

ऋतुराज गायकवाडच्या पहिल्या आयपीएल शतकाच्या मदतीने चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकांत 4 बाद 189 धावा केल्या होत्या. गायकवाडने शेवटच्या चेंडूवर आपले शतक पूर्ण केले. राजस्थानने 190 चेंडूचा पाठलाग करताना 15 चेंडू शिल्लक ठेवले होते. त्यांनी फक्त तीन विकेट गमावल्या. तसेच सामना जिंकला.