Gautam Gambhir On IPL: भारतीय क्रिकेटसाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे 'आयपीएल', गौतम गंभीरचे धक्कादायक विधान
Gautam Gambhir (Photo Credit - Twitter)

Gautam Gambhir On IPL: भारताचे माजी सलामीवीर आणि भाजप पक्षाचे विद्यमान खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) हा आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतो. गौतम गंभीर हा टी-20 विश्वचषक 2007 आणि एकदिवसीय विश्वचषक 2011 जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य आहे. त्याने टीम इंडियाला (Team India) अनेक सामने स्वबळावर जिंकून दिले होते. गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने दोनदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. आता गंभीरने आयपीएलवर मोठे वक्तव्य केले आहे. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर असे मानतो की, गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेटमध्ये घडलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आयपीएलची (IPL) ओळख.

आयपीएलकडे बोट दाखवू नका

पुढे बोलताना तो म्हणाला, 'मला असे म्हणायचे आहे की आयपीएल ही भारतीय क्रिकेटमध्ये घडलेली सर्वोत्कृष्ट गोष्ट आहे, परंतु प्रत्येक वेळी जेव्हा भारतीय खेळाडू क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत नाहीत तेव्हा सर्व जबाबदारी आयपीएलवर येते जी योग्य नाही. जर आम्ही आयसीसी स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली नाही, तर खेळाडूंना दोष द्या, त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना जबाबदार धरा, परंतु आयपीएलकडे बोट दाखवू नका.

आयपीएलमधून खेळाडूंना हा मिळतो फायदा 

आयपीएल मध्ये 154 सामने खेळलेला गौतम गंभीर म्हणाला, “आयपीएलमध्ये आल्याने खेळाडूंना आर्थिक सुरक्षिततेची जाणीव झाली आहे. एक खेळाडू वयाच्या 35-36 पर्यंत कमवू शकतो. आयपीएल त्याला आर्थिक सुरक्षा प्रदान करते जे महत्त्वाचे आहे. जे तळागाळातील अधिक खेळाडूंच्या विकासासाठी मदत करत आहे.' (हे देखील वाचा: ICC ODI Ranking: पहिली वनडे हरल्यानंतरही टीम इंडिया आयसीसी क्रमवारीत बनू शकते नंबर वन, फक्त करावे लागेल हे काम)

भारतीय प्रशिक्षकांना चालना मिळते

पुढे बोलताना गौतम गंभीर म्हणाला, 'मी लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटर आहे. मला एक गोष्ट बदलायची आहे की मला सर्व भारतीय प्रशिक्षकांना आयपीएलमध्ये पाहायचे आहे. कारण बिग बॅश किंवा इतर कोणत्याही परदेशी लीगमध्ये कोणत्याही भारतीय प्रशिक्षकाला संधी मिळत नाही. भारत क्रिकेटमध्ये महासत्ता आहे, पण आमच्या प्रशिक्षकांना कुठेही संधी मिळत नाही. सर्व परदेशी येथे येतात.