
ICC T20 World Cup 2024 Final: गेल्या वर्षी याच दिवशी म्हणजेच 29 जून 2024 रोजी भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने इतिहास रचला. हा भारतीय क्रिकेट इतिहासासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 चा खिताब जिंकला. 17 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर टीम इंडियाने टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकली. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 30 चेंडूत 30 धावांची आवश्यकता होती. दक्षिण आफ्रिकेच्या सहा विकेट्स होत्या. त्यावेळी सर्वांना वाटले होते की दक्षिण आफ्रिकेवरून चोकरचा टॅग निघून जाईल, परंतु टीम इंडियाच्या गोलंदाजांनी संपूर्ण सामना उलटा केला.
Long off, long off, Long off!! 😍🤩@ImRo45 relives the heart-stopping moment @surya_14kumar took that catch to dismiss @DavidMillerSA12 in the finals of @T20WorldCup, 2024! 🏆
𝐂𝐡𝐚𝐦𝐩𝐢𝐨𝐧𝐬 𝐖𝐚𝐥𝐢 𝐅𝐞𝐞𝐥𝐢𝐧𝐠 𝐏𝐡𝐢𝐫 𝐒𝐞 WATCH NOW on JioHotstar👉… pic.twitter.com/8eq0gp5mKR
— Star Sports (@StarSportsIndia) June 28, 2025
अंतिम सामन्याचा थरार
दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 30 चेंडूत 30 धावांची गरज होती आणि 6 गडी शिल्लक होते. सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने झुकला असतानाही टीम इंडियाने शेवटच्या 5 षटकांत कमाल केली. (हे देखील वाचा: ICC T20 World Cup 2024 Win Anniversary: टी-20 विश्वचषक 2024 च्या विजयाला वर्षपूर्ती; रोहित शर्मा झाला भावूक)
-
16 वे षटक: जसप्रीत बुमराहने 4 धावा देत दबाव वाढवला.
-
17 वे षटक: हार्दिक पंड्याने हेनरिक क्लासेनला बाद करत सामन्याचं वळण बदललं.
-
18 वे षटक: बुमराहने मार्को जॅनसेनला बोल्ड करत फक्त 2 धावा दिल्या.
-
19 वे षटक: अर्शदीप सिंगने काटेकोर गोलंदाजी करत फक्त 4 धावा दिल्या.
-
20 वे षटक: हार्दिक पंड्याच्या पहिल्याच चेंडूवर डेव्हिड मिलरने षटकाराचा प्रयत्न केला, पण सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर अप्रतिम झेल घेऊन सामन्याला कलाटणी दिली.
विजयाचा नायक
भारताने 7 धावांनी सामना जिंकला. भारताकडून विराट कोहलीने 76 धावा करत सामनावीर पुरस्कार पटकावला, तर जसप्रीत बुमराह प्लेयर ऑफ द टूर्नामेंट ठरला. सामन्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. भारताने केवळ सामना नव्हे तर संपूर्ण देशाच्या भावना जिंकल्या. टी-20 विश्वचषक 2024 मधील हा अंतिम सामना कायम स्मरणात राहील.