Team India (Photo Credit - X)

मुंबई: भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ (Indian National Cricket Team) आणि बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यात दोन कसोटी सामन्याची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईत होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामने होणार आहेत. यासाठीची टीम लवकरच जाहीर होऊ शकते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. टीम इंडिया अनुभवी खेळाडूंबरोबरच युवा खेळाडूंनाही संधी देऊ शकते. पण ते त्याच्या सध्याच्या फॉर्मवर अवलंबून असेल. सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांना संधी मिळू शकते. यशस्वी जैस्वालने टीम इंडियासाठी चांगली कामगिरी केली आहे. यशस्वी आणि शुभमन गिलचे संघातील स्थान जवळपास निश्चित झाले आहे.

शुभमनने दुलीप ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली तर ही त्याच्यासाठी महत्त्वाची संधी असू शकते. टीम इंडिया सर्फराज खान आणि ध्रुव जुरेललाही संधी देऊ शकते. सर्फराज आणि जुरेल यांनी भारतीय संघासाठी पदार्पण केले आहे. टी-20 इंटरनॅशनलमधून निवृत्ती घेतलेल्या रवींद्र जडेजालाही संधी मिळू शकते. जडेजा हा अनुभवी अष्टपैलू खेळाडू आहे. (हे देखील वाचा: Ajinkya Rahane Century: 19 महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अजिंक्य राहणेने झळकावले शतक, टीम इंडियाचे ठोठावले दार)

टीम इंडिया स्पिनर्सवर विशेष लक्ष देऊ शकते. कुलदीप यादव आणि रविचंद्रन अश्विन हे भारतीय संघासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि मुकेश कुमार यांनाही संधी मिळू शकते. भारतीय संघ अर्शदीप सिंगच्या नावावरही विचार करू शकतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची निवड समिती दुलीप ट्रॉफीमधील खेळाडूंच्या कामगिरीवरही लक्ष ठेवणार आहे. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचे स्थान जवळपास निश्चित झाले आहे. पंतने दमदार पुनरागमन केले आहे. तो मुख्य यष्टिरक्षक फलंदाज बनू शकतो.

बांगलादेशविरुद्ध भारताचा संभाव्य कसोटी संघ - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, सर्फराज खान, देवदत्त पडिक्कल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज. मुकेश कुमार, आकाश दीप / अर्शदीप सिंग