India Beat Sri Lanka Tri-Nation Series 2025 Final Match: श्रीलंकेचा पराभव करुन भारताने जिंकली तिरंगी मालिका, स्मृतीनंतर स्नेह आणि अमनजोत कौर यांनी केला चमत्कार

तिंरगी मालिकेत टीम इंडियाने श्रीलंकेचा 97 धावांनी पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने तिरंगी मालिकेवर कब्जा केला आहे. या तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघाची कमान हरमनप्रीत कौरकडे होती. तर, श्रीलंकेचे नेतृत्व चमारी अथापथु यांच्याकडे होते.

Team India W (Photo Credit- X)

Sri Lanka Women National Cricket Team vs India Women National Cricket Team, Tri-Nation Series 2025 Final Match Scorecard Update: श्रीलंका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारत महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तिरंगी मालिकेचा अंतिम सामना आज म्हणजेच 11 मे रोजी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 97 धावांनी पराभव केला आहे. यासह, टीम इंडियाने तिरंगी मालिकेवर कब्जा केला आहे. या तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघाची कमान हरमनप्रीत कौरकडे होती. तर, श्रीलंकेचे नेतृत्व चमारी अथापथु यांच्याकडे होते. (हे देखील वाचा: Smriti Mandhana Century: स्मृती मानधनाने 11 वे शतक ठोकून रचला इतिहास, अशी कामगिरी करणारी ठरली जगातील तिसरी फलंदाज)

या रोमांचक सामन्यात टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकल्यानंतर, भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला आणि त्यांची सुरुवात स्फोटक होती आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी आक्रमक फलंदाजी केली आणि 70 धावांची भागीदारी केली. टीम इंडियाने निर्धारित 50 षटकांत सात गडी गमावून 342 धावा केल्या. टीम इंडियाकडून सलामीवीर स्मृती मानधनाने 116 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, स्मृती मानधनाने 101 चेंडूत 15 चौकार आणि दोन षटकार मारले. स्मृती मानधनाशिवाय हरलीन देओलने 47 धावा केल्या.

दुसरीकडे, इनोका रणवीराने श्रीलंकेच्या संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. श्रीलंकेसाठी मल्की मदारा, दुमी विहंगा आणि सुगंधिका कुमारी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. इनोका रणवीराशिवाय मलकी मदारा, दुमी विहंगा आणि सुगंधिका कुमारी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेला 50 षटकांत 343 धावा कराव्या लागणार होत्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि सलामीवीर हसनी परेरा खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. नंतर, सलामीवीर विश्मी गुणरत्ने आणि कर्णधार चामारी अथापथू यांनी डाव सावरला आणि संघाची धावसंख्या 65 धावांच्या पुढे नेली. संपूर्ण श्रीलंकेचा संघ 48.2 षटकांत फक्त 245 धावांवर आटोपला. श्रीलंकेसाठी कर्णधार चमारी अथापथूने 51 धावांची शानदार खेळी केली. या धमाकेदार खेळीदरम्यान, चामारी अथापथ्थूने 66 चेंडूत सहा चौकार आणि एक षटकार मारला. चामारी अथापथुशिवाय नीलाक्षी डी सिल्वाने 48 धावा केल्या. त्याच वेळी, अमनजोत कौरने टीम इंडियाला पहिले मोठे यश मिळवून दिले. टीम इंडियाकडून स्नेह राणाने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. स्नेहा राणा व्यतिरिक्त अमनजोत कौरने तीन विकेट्स घेतल्या.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement