IND vs ENG 2021: भारत-इंग्लंड मालिकेत ‘हा’ संघ होणार विजयी, Michael Vaughan यांनी वर्तवला मालिकेच्या निकालाचा अंदाज
विराट कोहली व जो रूट (Photo Credit: PTI)

IND vs ENG Series: 2021 च्या सुरुवातीला भारतात झालेल्या भारत (India)-इंग्लंड (England) कसोटी मालिकेदरम्यान, माइकल वॉन (Michael Vaughan) खेळपट्ट्यांबाबत केलेल्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत राहिले. वॉन अनेकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय असतात आणि कसोटी मालिकेपूर्वी आपला अंदाज शेअर करण्यास कधीही मागे हटत नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सलामीच्या सामन्यापूर्वी माजी ब्रिटिश कर्णधाराने आगामी मालिकेबद्दल आपली मते मांडली आहेत. वॉनने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम स्कोअरलाइनसह विजेत्याचा अंदाज वर्तवला आहे. 4 ऑगस्टपासून नॉटिंगहम  (Nottingham) येथील ट्रेंट ब्रिजवर कसोटी मालिका सुरू होत आहे. (IND vs ENG 1st Test Likely Playing XI: पहिल्या कसोटीत मयंक अग्रवालच्या जागी कोणाची लागेल वर्णी? पाहा भारताचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन)

मालिकेचे विश्लेषण करताना वॉनने क्रिकबझला सांगितले, “मला माहित आहे की मला काही बरोबर आणि काही चुकीचे समजतात. पण, बेन स्टोक्स नाही आणि न्यूझीलंडने नुकताच या संघावर मात केली हे लक्षात घेऊन भारत ही मालिका जिंकेल. त्यांना येथे जिंकण्याची उत्तम संधी आहे. स्टोक्स नसल्यामुळे इंग्लंडला या संघात समतोल साधणे कठीण होईल. ते किमान एक फलंदाज किंवा गोलंदाज कमी असतील. त्यामुळे जो रूटला सांभाळणे कठीण होईल. ऑगस्ट आणि सप्टेंबर स्पिन एक भूमिका बजावते. मी भाकीत करणार आहे आणि मला हे सांगणे आवडत नाही, भारत 3-1 ने जिंकणार आहे,” वॉनने मत व्यक्त केले. वॉनने काही कारणेही स्पष्ट केली आणि सांगितले की, भारत पाच सामन्यांची कसोटी मालिका जिंकण्यासाठी अनुकूल आहे. भारत इंग्लंडमध्ये बऱ्याच आशेने दाखल झाला आहे आणि तो यजमान संघापेक्षा अधिक बलाढ्य दिसत आहे.

अष्टपैलू बेन स्टोक्सने अलीकडेच मानसिक आरोग्याच्या समस्यांचा हवाला देत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तेव्हापासून अनेकांनी त्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे कारण सध्याच्या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय खेळाडूंना खेळणे कठीण दिसत आहे विशेषतः बायो-बबलमध राहून खेळणे. दुसरीकडे, इंग्लंडने जूनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्यांची शेवटची घरची मालिका 1-0 ने गमावली. दरम्यान, दुखापतीच्या अनेक समस्यांमुळे कोहली अँड कंपनीला कसोटी मालिकेच्या सलामीच्या सामन्यापूर्वी काही निवडक डोकेदुखी आहे.