Rohit Sharma ने Virat Kohli नंतर Anushka Sharma ला इंस्टाग्रामवर केले Unfollow, बॉलीवूडच्या 'परी'ने असा मारला टोमणा
अनुष्का शर्मा, विराट कोहली आणि रोहित शर्मा (Photo Credits: File image)

आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकमध्ये न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध सेमीफायनल सामन्यात भारतीय संघाच्या (Indian Team) धक्कादायक परभवानंतर संघात फूट पडल्याचे बोलले जात होते. टीम इंडियामध्ये कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा दोन गट बनले असल्याचे वृत्त समोर आले होते. पण बीसीसीआयने (BCCI) यावर स्पष्टीकरण देत हे वृत्त स्पष्ट नाकारले. विश्वचषकमधील पराभवानंतर रोहित आणि विराट यांच्यात दुरावा आल्याचे समोर आले होते. स्पर्धेतून बाहेर पाडल्यानंतर रोहित पत्नी रितिका (Ritika) आणि लेक समयरा (Samaira) सह संघाला लंडनमध्ये मागे सोडत मुंबईला परतला तर विराट तिथेच पत्नी अनुष्का शर्मा सोबत राहिला. यामुळे क्रिकेटच्या या दोन महान खेळाडूंमध्ये दुरावा आल्याचे समोर आले. शिवाय, रोहितने नुकतेच सोशल मीडिया, इंस्टाग्रामवर विराट पाठोपाठ अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ला देखील अनफॉलो केल्याचे म्हटले जात आहे. (IND vs WI: वेस्ट इंडिज दौऱ्याआधी विराट कोहलीने उघडकीस केले आपल्या सकारात्मक दृष्टीकोनाचे गुपित, पहा हा Video)

आता रोहितच्या या कृतीवर आपली प्रतिक्रिया देत अनुष्काने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. हा एक कोड संदेश दिसत आहे आणि या पोस्टमध्ये अनुष्का सध्याच्या परिस्थितीचे वर्णन करीत आहेत. अनुष्काने आपल्या इंस्टाग्राम पोस्टवर लिहिले की,"एकदा एक शहाणा माणूस काहीच नाही बोलला. खोट्या देखाव्याच्या गोंधळात शांतताच सत्याचा पकडू शकते." असं मानलं जातं की रोहितने ज्या प्रकारे अनुष्का आणि विराटला सोशल मीडियावर अनफॉलो केले त्यावरच अनुष्काने अशी प्रतिक्रिया दिली आहे.

अनुष्का शर्मा इंस्टाग्राम पोस्ट (Photo Credit: Anushka Sharma/Instagram)

रोहित आणि विराटमधील मानभेदामुळेच रोहितने अनुष्का आणि संघाच्या कर्णधाराला अनफॉलो केले आहे असे म्हटले जातेय. टीम इंडियाच्या या दोन तुफान खेळाडूंमधील वाद आता सोशल मीडियावर देखील येऊन पोहचला आहे. रोहित आणि अनुष्का भारतीय संघाचे दोन मजबूत स्तंभ आहे. संघाला त्यांची गरज आहे. त्यामुळे, विश्वचषकमधील पराभव विसरत या दोघांना आपल्यामधील तणाव दूर करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.