टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. दुसरा सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. भारतीय संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टी-20 मालिकेत उतरली आहे. दरम्यान, भारताने न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना भारताला तिसरा मोठा धक्का बसला आहे. सूर्य कुमार यादव 24 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 131/3

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)