टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज T20 तिरंगी मालिकेचा अंतिम सामना खेळला जात आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात हा अंतिम सामना खेळला जात आहे. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 109 धावा केल्या. टीम इंडियाकडून हरलीन देओलने सर्वाधिक 46 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून नॉनकुलुलेको म्लाबाने दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला पहिली विकेट मिळाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 7/1

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)