IND vs BAN: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला एका विकेटच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. टीम इंडियाला हा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधायची आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) बांगलादेश संघाला पहिला धक्का दिला आहे. त्याने सलामीवीर एनामुल हकला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याने नऊ चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने 11 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार लिटन दासही आऊट झाला आहे.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)