Virat Kohli & Shikhar Dhawan Out: भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जात आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडिया मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. अशा परिस्थितीत मालिकेत टिकण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकावाच लागेल. या सामन्यात बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून भारतासमोर विजयासाठी 272 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. रोहित शर्माच्या दुखापतीमुळे डावाला सुरुवात करणारा विराट कोहली अवघ्या 5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. तर विराट नंतर शिखर धवनही आऊट झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)