India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत (Indian National Cricket Team) आणि बांगलादेश (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. हा कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा पहिला डाव 376 धावांवर आटोपला. भारताकडून रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक 113 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव 149 धावांत गारद झाला. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने सर्वाधिक धावा केल्या. शाकिब अल हसनने 32 धावा केल्या. तर भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. दरम्यान दुसऱ्या डावात भारताला पहिला धक्का लागला आहे. रोहित शर्मा 5 धावा करुन बाद झाला आहे. भारताचा स्कोर 16/1

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)