IND vs BAN 2nd Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे होत आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून टीम इंडिया 1-0 ने पुढे आहे. आता दुसरा सामनाही जिंकून भारताला मालिका 2-0 अशी खिशात घालायची आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान भारताला दोन विकेट मिळाल्या आहे. जयदीप उनाडकर आणि आर अश्विनला विकेट मिळाली. बांगलादेशने आपले दोन्ही सलामीवीर चार चेंडूंत गमावले आहेत. झाकीर बाद झाल्यानंतर शांतोही तिसऱ्या चेंडूवरच पॅव्हेलियनमध्ये परतला. रविचंद्रन अश्विनने त्याला एलबीडब्ल्यू आऊट केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)