राज ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय भूमिका बजावण्याच्या तयारीत आहेत. यावेळी त्यांनी मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. महाराष्ट्राच्या स्थापना दिनानिमित्त राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये मोठी रॅली आयोजित केली आहे. सध्या इथल्या सभेला ते संबोधित करत आहेत. यावेळी त्यांनी सांगितले की, संभाजीनगर हा महाराष्ट्राचा मध्य आहे. यापुढील माझ्या सर्व सभा मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात होणार आहेत. यासह विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण अशा राज्यातील विविध भागात सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)