महाराष्ट्रात सध्या पश्चिम महाराष्ट्र व कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे दरड कोसळून अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रायगड येथे घडलेल्या घटनेबाबत दु: ख व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या आहेत- 'मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती चिंताजनक आहे. अशा कठीण प्रसंगी प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी माझी प्रार्थना. मृतकांच्या कुटूंबियांबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करते.'

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)