टी-20 वर्ल्ड कप 2021 च्या दोन्ही सराव सामन्यांमध्ये टीम इंडियाने जोरदार कामगिरी केली. इंग्लंडला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियावर देखील भारी पडला. खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे विराट आणि मार्गदर्शक धोनीसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. आता टीम मॅनेजमेंटपुढे भारताच्या कोणत्या 11 धुरंधरांना पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरवावे याचा पेच उभा राहिला आहे.
...