विराट कोहलीने भारतीय टी-20 संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. यूएईमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर तो या पदावरून पायउतार होईल. आता विराट कर्णधारपद सोडल्यानंतर पुढील कर्णधार कोण असेल या प्रश्नाची सध्या चर्चा होऊ लागली आहे. रोहित शर्माचे नाव सध्या आघाडीवर आहे. तथापि दोन युवा खेळाडूंमध्येही भरपूर दम आहे आणि ते टी-20 संघाचे नवीन कर्णधारपदाचे दावेदार असू शकतात.
...