⚡दुसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेक पर्यंत भारताने गमावल्या चार विकेट
By Nitin Kurhe
दुसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेक पर्यंत भारताने 7 विकेट गमावून 454 धावा केल्या आहे. पहिल्या सत्रात भारताने 95 धावांत चार विकेट गमावल्या. शुभमन गिल (147), ऋषभ पंत (134), करुण नायर (0) आणि शार्दुल ठाकूर (1) पॅव्हेलियनमध्ये परतले.