भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 3 डिसेंबर, शुक्रवारपासून मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पाऊस खलनायक ठरू शकतो. यापूर्वी मुंबईसह महाराष्ट्राच्या अन्य शहरांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला असून वानखेडेच्या खेळपट्टीवरही याचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे खेळपट्टीवरून गोलंदाजांना मदत होऊ शकते असे मानले जात आहे.
...