क्रिकेट विश्वातील कट्टर प्रतिस्पर्धीपैकी एक भारत आणि पाकिस्तान संघात 24 ऑक्टोबर रोजी टी-20 विश्वचषक रोमांचक लढत रंगणार आहे. आतापर्यंत पाकिस्तान टी-20 विश्वचषकात भारताला एकदाही पराभूत करू शकलेला नाही. भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी पाकिस्तानचे माजी कर्णधार इंजमाम-उल-हक यांनी धक्कादायक विधान केले आहे. इंजमाम यांनी म्हटले की, भारतीय संघाला जिंकण्याची अधिक शक्यता आहे.
...