या सामन्यात रोहित शर्माला सुरुवातीलाच जीवदान मिळाले. त्याला पहिल्या तीन धावांवर आणि नंतर 12 धावांवर जीवदान मिळाले. त्यानंतर रोहित शर्माने कोणतीही संधी दिली नाही आणि सतत धावा काढत राहिला. रोहित शर्माने सामन्यात दोन षटकार मारताच, तो आयपीएलमध्ये 300 षटकार मारणारा भारताचा पहिला फलंदाज आणि जगातील दुसरा फलंदाज बनला.
...