उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, दिल्ली येथे शिवाजी महाराजांच्या भव्य राष्ट्रीय स्मारकासाठी राज्य प्रयत्नशील आहे. आम्ही राज्याभिषेक सोहळ्याचे साक्षीदार आहोत. स्वराज्याची सुरुवात करणाऱ्या या सोहळ्यात महाराष्ट्राचा पाया आहे. शिवाजी महाराज हे त्यांच्या न्यायप्रणालीसाठी ओळखले जातात, त्यामुळे दिल्लीत राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी आमची मागणी आहे, असंही फडणवीस म्हणाले.
...