छत्रपती शिवाजी महाराज, महिला, महापुरुष यांच्याबद्दल पाठिमागील काही दिवसांपासून वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधाने होत आहेत. ही विधाने करणयात राज्यपाल, बुवा, बाबा आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या विधानावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जोरदार आक्रमक झाला आहे. या गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आहे.
...