मुंबईत पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचे कौतुक केले, परंतु त्याचवेळी त्यांनी या कारवाईच्या दीर्घकालीन परिणामांवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी युद्ध किंवा हवाई हल्ले करणे हा कायमस्वरूपी उपाय नाही.
...