शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमध्ये लिहिले आहे की, देशात बेरोजगारीचा आकडा वाढत आहे. पंजाब आणि काश्मीर अशांत झाले असून राजकारण वेगळ्या दिशेने भरकटले आहे. देशाची नवी पिढी कोणत्या दिशेने चालली आहे? अशा वेळी जगाला मार्गदर्शन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प आहेत, हे आश्चर्यकारक आहे.
...