⚡Maharashtra Krishi Din 2025: महाराष्ट्रात 1 जुलै रोजी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा होतो 'कृषी दिन'; जाणून घ्या महत्व
By Prashant Joshi
वसंतराव नाईक हे 1963 ते 1975 या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवले. त्यांनी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन आणि कृषी विद्यापीठांची स्थापना करून राज्याला शेतीत अग्रेसर बनवले.