झारखंड राज्यात, खास करुन रांची शहरामध्ये बर्ड फ्लू आजाराचा उद्रेक पाहायला मिळत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने चिकीन विक्री करण्यावर बंदी घातली आहे. इतकेच नव्हे तर प्रादेशिक पोल्ट्री फार्म आणि इतरही कुक्कुटपालन व्यवसायक असलेल्या ठिकाणांवरील जवळपास 4000 कोंबड्या आणि तत्सम पक्षी ठार मारले आहेत.
...