Pune Rains: सततच्या पावसाने पुणेकर त्रस्त; अपुऱ्या पायाभूत सुविधा, वाहून गेलेले रस्ते, खड्डे, उघडल्या मॅनहोलमुळे हाल आणखी वाढले (Video)

एकीकडे रस्ते खड्ड्यांनी भरलेले आहेत आणि दुसरीकडे अलीकडेच दुरुस्त केलेल्या रस्त्यांचे काही भाग पावसामुळे वाहून गेले आहेत. तुंबलेल्या गटारांमुळे गंभीर पाणी साचले आहे आणि प्रवास करणे धोकादायक बनले आहे. नागरिकांचा असा दावा आहे की, उघड्या मॅनहोलमुळे वाहने अडकण्याची किंवा पादचाऱ्यांना अपघाताने त्यात पडण्याची शक्यता आहे.

Pune Rains: सततच्या पावसाने पुणेकर त्रस्त; अपुऱ्या पायाभूत सुविधा, वाहून गेलेले रस्ते, खड्डे, उघडल्या मॅनहोलमुळे हाल आणखी वाढले (Video)
Pune Rains

पुणेकर (Pune) आधीच सततच्या पावसाने त्रस्त आहेत, अशात शहरातील अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे त्यांचे हाल आणखी वाढले आहेत. शहरात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे सुरु आहे, ज्यामुळे केवळ मालमत्तेचेच नुकसान झाले नाही, तर तीन जणांचा मृत्यूही झाला आहे. हिंजवडी, खराडी, हडपसर, फुरसुंगी आणि वारजे यासारख्या भागात पावसाचे पाणी घरांमध्ये आणि तळघरात शिरल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पुणे महानगरपालिकेकडे (PMC) तक्रारी नोंदवण्यासाठी आणि वेळेवर उपाययोजना मिळविण्यासाठी रहिवाशांना संघर्ष करावा लागत आहे.

एकीकडे रस्ते खड्ड्यांनी भरलेले आहेत आणि दुसरीकडे अलीकडेच दुरुस्त केलेल्या रस्त्यांचे काही भाग पावसामुळे वाहून गेले आहेत. तुंबलेल्या गटारांमुळे गंभीर पाणी साचले आहे आणि प्रवास करणे धोकादायक बनले आहे. नागरिकांचा असा दावा आहे की, उघड्या मॅनहोलमुळे वाहने अडकण्याची किंवा पादचाऱ्यांना अपघाताने त्यात पडण्याची शक्यता आहे.

सामाजिक कार्यकर्त्या दीपाली सरदेशमुख यांनी खराब रस्ते, उघडे मॅनहोल आणि रस्त्यांवरील खड्ड्यांबद्दल चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, 'मी पुणे महानगरपालिका आयुक्तांना पत्र लिहून अधिकाऱ्यांना आमच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये असे आवाहन केले आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. खड्डे असलेले रस्ते, वाहतुकीची गंभीर समस्या, अनधिकृत होर्डिंग्ज यामुळे नागरिकांना मोठा त्रास होत आहे.’

Pune Rains:

त्या पुढे म्हणाल्या, ‘अनेक रस्त्यांवर गटार आहेत. हडपसर, फुरसुंगी, भेकराईनगर, सासवड रोड, पालखी महामार्ग आणि सोलापूर रोड येथील रस्ते अतिशय वाईट स्थितीत आहेत आणि वाहतूकही खूपच वाईट आहे. हे सर्व भाग मृत्यूचे सापळे बनले आहेत. या भागात वारंवार अपघात होत आहेत. सर्व रस्त्यांवर अनधिकृत फेरीवाले आहेत, ज्यामुळे रस्त्यावर चालण्यासाठी जागा नाही. तसेच, बस, ट्रक आणि इतर वाहने रस्त्यांवर उभी आहेत. मी अधिकाऱ्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची आणि आम्हाला दिलासा देण्याची विनंती करते.’ (हेही वाचा: Maharashtra Rains: महाराष्ट्रात पावसामुळे 24 ते 27 मे दरम्यान 21 जणांचा मृत्यू; पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, नवी मुंबई जिल्ह्यांना सर्वाधिक फटका)

फुरसुंगीचे रहिवासी दीपक वाडकर म्हणाले, ‘फुरसुंगीसारख्या भागात अधिकाऱ्यांचे पूर्ण दुर्लक्ष होत आहे. अधिकाऱ्यांचा दावा आहे की हा परिसर नगर परिषदेत येतो, परंतु तो पूर्वी पीएमसीच्या अखत्यारीत होता, त्यांनी काही रस्ते सुधारायला हवे होते आणि सुविधा पुरवायला हव्या होत्या. आमच्याकडे नगरसेवक नाहीत, ज्यामुळे आमचे प्रश्न आणखी बिकट होत आहेत. आम्ही राज्य सरकारला हस्तक्षेप करण्याचे आवाहनही केले होते आणि त्यांनी प्रत्यक्षात 120 मीटर रस्त्याच्या विकासासाठी सुमारे 80 लाख रुपये मंजूर केले होते. आणि दीड महिन्यांपूर्वी त्यांनी रे रद्द केले. या रस्त्याला पालखी मार्ग असेही म्हणतात कारण वारकरी या रस्त्यावरून कूच करतात, तरीही रस्त्यांची अवस्था वाईट आहे.’

(The above story first appeared on LatestLY on May 29, 2025 04:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).