Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी शीख समुदायाने दिला भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला पूर्ण पाठिंबा

येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानात सहभागी व्हावे आणि विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवण्यासाठी महायुतीला पाठिंबा द्यावा, असे शीख समाजाच्या वतीने निवेदनात म्हटले आहे.

Sikh Community (संग्रहित संपादित-प्रातिनिधिक प्रतिमा)

Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्रातील शीख समुदायाने () आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला (Mahayuti) अधिकृतपणे आपला पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे सत्ताधारी आघाडीची स्थिती मजबूत झाली आहे. याबाबत महाराष्ट्रातील शीख समुदायाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘गेल्या अडीच वर्षांपासून सरकारने गुरु नानक नाम लेवा संगत, शीख, हिंदू पंजाबी, लुबाना, सिकलीगर, सिंधी आणि बंजार यांच्या कल्याण आणि उन्नतीसाठी धोरणे राबवली आहेत.’

संत हरमन सिंग खालसा यांनी स्वाक्षरी केलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे, ‘सरकारने या समुदायांच्या उत्थानासाठी ऐतिहासिक पावले उचलली आहेत. महाराष्ट्र सरकारच्या अल्पसंख्याक आयोगावर एका शीख सदस्याची नियुक्ती करण्यात आली आहे आणि इतर उपक्रमांसह 11 सदस्यीय महाराष्ट्र पंजाबी साहित्य अकादमीची स्थापना करण्यात आली आहे. या बाबी शीख समाजाच्या कल्याणासाठी महायुती सरकारचा स्पष्ट हेतू दर्शवतात.’

येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानात सहभागी व्हावे आणि विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवण्यासाठी महायुतीला पाठिंबा द्यावा, असे शीख समाजाच्या वतीने निवेदनात म्हटले आहे. गेल्या महिन्यात, राज्यातील शीख आणि इतर पंजाबी भाषिकांपर्यंत पोहोचण्यासाठी, महाराष्ट्राने पूर्वीच्या सरकारने विसर्जित केलेल्या पंजाबी साहित्य अकादमीची पुनर्रचना केली. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगामध्ये शीख सदस्याची नियुक्ती करण्याची घोषणाही सरकारने केली. याआधी 11 ऑक्टोबर रोजी पारित झालेल्या शासन निर्णयात हे निर्णय जाहीर करण्यात आले. (हेही वाचा: Eknath Khadse Announces Retirement: राष्ट्रवादी-एसपीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती; केले मुलगी रोहिणी खडसे यांना निवडून देण्याचे आवाहन)

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सोमवार, 18 नोव्हेंबर हा शेवटचा दिवस आहे. सोमवार रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून शांतता कालावधी सुरू होणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी 15 ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण 660 कोटी 16 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्यातील 288 विधानसभांसाठी बुधवार, 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now