Sanjay Nirupam: सरकारला राज ठाकरेंची भीती वाटत आहे का? राज ठाकरेंवर कारवाई न झाल्याबद्दल संजय निरुपम यांनी नाराजी केली व्यक्त
संजय निरुपम (Photo Credits-Twitter)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना राज्य सरकार घाबरले आहे आणि त्यामुळे 1 मेच्या औरंगाबाद मेळाव्यासाठी "शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी" त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केला आहे. राज्यातील जातीय तणाव भडकवण्यापासून रोखणे आवश्यक असल्याचे सांगून काँग्रेस नेत्याने रॅलीच्या अटींचे उल्लंघन केल्याबद्दल मनसे प्रमुखांच्या अटकेची मागणी केली. संजय निरुपम यांनी मुंबई पोलिसांकडून मनसे प्रमुखांवर 'कारवाई न झाल्याबद्दल' नाराजी व्यक्त केली आहे. निरुपम म्हणाले, "महाराष्ट्र पोलिसांनी औरंगाबाद येथील सभेसाठी 16 अटी घातल्या होत्या, त्यापैकी 12 अटींचे उल्लंघन केले आहे. राज ठाकरे यांच्या विरोधात दोन न्यायालयांचे अजामीनपात्र वॉरंट आहेत. मुंबई पोलिस का काहीच करत नाहीत हे मला समजत नाही आहे.

कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असे ते म्हणाले. निरुपम म्हणाले, देशात आणि महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे आणि जो कोणी कायद्याला आव्हान देईल त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे.

मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

राज ठाकरे यांनी 1 मे रोजी औरंगाबादेत सभा घेऊन लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे सरकारवर सडकून टीका केली होती. त्यांनी मशिदींतील लाऊडस्पीकर काढण्यासाठी 3 मे ही अंतिम मुदत ठेवली होती. "राज्य सरकारने कालमर्यादेत कारवाई केली नाही, तर त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते मशिदींसमोर मोठ्याने 'अजान' आवाजात हनुमान चालीसा वाजवतील,' अशी धमकीही त्यांनी दिली होती. हनुमान चालीसा वाजवण्यासाठी मशिदीबाहेर लाऊडस्पीकर लावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. (हे देखील वाचा: Navneet Rana आणि Ravi Rana यांना न्यायालयाकडून दिलासा; 'देशद्रोहाचा गुन्हा नोंदवणे चुकीचे, पुरेशी कारणे नाहीत'- कोर्टाची टिपण्णी)

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परळी येथील न्यायालयाने प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपाखाली 2008 च्या एका प्रकरणात राज ठाकरे यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. याआधी 3 मे रोजी सांगलीतील न्यायालयाने ठाकरे यांच्याविरुद्ध 2008च्या खटल्यात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.