BMC Eco-friendly Ganeshotsav 2025: पर्यावरणपूरक मूर्तीसाठी मुंबई महापालिका फुकट पुरवणार शाडूची माती

गणपती उत्सव (Ganeshotsav 2025) सुरु होण्यास अद्याप बराच अवकाश आहे. असे असले तरी, गणेशोत्सव (Ganeshotsav) काळात होणारे प्रदुषण टाळण्यासाठी आणि गणेशमुर्तीसोबत घडणारे असंस्कृत प्रसंग टाळण्यासाठी बृहनमुंबई महानगरपालिका आतापासूनच कामाला लागली आहे.

Ganpati Utsav (Photo Credits: PTI)

बीएमसी यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव (Eco-friendly Idols) साजरा करण्यास भर देणार आहे. त्यासाठी पालिकेने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. पालिकेने आपल्या एक्स (जुने ट्विटर) हँडलवर दिलेल्या माहितीनुसार, पर्यावरणपूरक मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) शाडू माती (Shadu Soil) विनामूल्य उपलब्ध करुन देणार आहे. पालिकेच्या या उपक्रमास किती मुर्तीकार आणि नागरिक कसा प्रतिसाद देतात याबाबत उत्सुकता आहे.

शाडू माती विनामूल्य मिळविण्यासाठी काय कराल?

आपण मूर्तीकार असाल आणि आपणास पर्यावरणपूरक मुर्ती साकारण्यासाठी जर शाडू माती हवी असेल तर काळजी करु नका. ही माती तूम्हाला सहज उपलब्ध होऊ शकते. तीसुद्धा अगदी मोफत. होय, मुंबई महापालिकेने या खास उपक्रमाबाबत माहिती देताना म्हटले आहे की, जे मूर्तीकार अशा प्रकारे शाडू माती मोफत मिळवू इच्छितात त्यांनी https://www.mcgm.gov.in या अधिकृत संकेतस्थळास भेट द्या, असे बीएमसीने आपल्या एक्सपोस्टमध्ये म्हटले आहे.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य

मुंबई महानगरपालिकेने चला साजरा करुया, पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव! अशी हाक देत केवळ शाडूची मातीच नव्हे तर अल्पकाळासाठी मंडप उभारण्यासाठी जागासुद्धा मोफत उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली आहे. महत्त्वाचे म्हणजे या उपक्रमाचा लाभ प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर दिली जाणार आहे. (हेही वाचा, Sankashti Chaturthi May 2025: 16 मे दिवशी संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ)

पर्यावरणपूरक गणेशोत्सव हा पारंपारिक उत्सव साजरा करताना पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाचा आहे. गणपतीचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो, परंतु पारंपारिक उत्सवांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्ती, रासायनिक रंग आणि जैवविघटन न होणारी सजावट यांचा वापर केल्यामुळे अनेकदा प्रदूषण होते. शाश्वत पद्धतींकडे वळल्याने भक्ती आणि पर्यावरणीय जबाबदारी एकत्र येते हे सुनिश्चित होते.

पर्यावरणपूरक उत्सव का महत्त्वाचा?

पर्यावरणपूरक उत्सवाचा एक प्राथमिक फायदा म्हणजे जल प्रदूषण कमी करणे. पीओपीपासून बनवलेल्या पारंपारिक मूर्ती पाण्यात सहज विरघळत नाहीत, ज्यामुळे जलचरांना हानी पोहोचते आणि नद्या आणि तलाव प्रदूषित होतात. मातीच्या मूर्ती वापरल्याने त्या नैसर्गिकरित्या विरघळतात, कोणतेही विषारी अवशेष राहत नाहीत. याव्यतिरिक्त, नैसर्गिक रंग आणि सेंद्रिय सजावट निवडल्याने रासायनिक दूषितता कमी होते, ज्यामुळे विसर्जन समारंभ पर्यावरणासाठी सुरक्षित होतात.

पर्यावरणपुरकतेसाठी पालिकेचे महत्त्वाचे पाऊल

आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे कचरा कमी करणे. प्लास्टिक सजावट आणि थर्माकोल-आधारित डिझाइनमुळे पुनर्वापर न करता येणारा कचरा जास्त प्रमाणात वाढतो. त्याऐवजी, केळीची पाने, फुले आणि कागद यासारख्या जैवविघटनशील पदार्थांचा वापर पर्यावरणाचे नुकसान कमी करतो. पर्यावरणाविषयी जागरूक सजावट तयार करण्यात समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देणे जागरूकता आणि सामूहिक जबाबदारी देखील वाढवते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement