Coronavirus In Maharashtra Police: महाराष्ट्र पोलीस दलात गेल्या 24 तासात आणखी 198 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; आकडा 21,152 वर पोहचला
Maharashtra Police (Photo Credit: Twitter)

Coronavirus In Maharashtra Police: राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने सर्वजण त्रस्त झाले आहेत. तर दिवसागणिक हजारोंच्या संख्येने रुग्ण आढळून येत असल्याने कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व मार्गाने प्रयत्न करण्यात येत आहेत. याच दरम्यान आता राज्यातील पोलीस दलातील आणखी 198 जणांना गेल्या 24 तासात लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलीस दलातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 21,152 वर पोहचल्याची माहिती महाराष्ट्र पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे.

पोलीस दलातील एकूण 17,295 जणांना कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 217 कर्मचाऱ्यांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.  कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी कोविड योद्धे आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. तसचे कोरोनावर अद्याप ठोस लस उपलब्ध नसल्याने सर्व वैज्ञानिक आणि संशोधक त्यावर अभ्यास करत आहेत. राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, औरंगाबादसह अन्य काही ठिकाणी कोरोनाचे झपाट्याने रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कन्टेंटमेंट झोन वगळून अन्य ठिकाणी अनलॉकिंग नुसार काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे.(106 year-old Maharashtra woman beats Covid-19: महाराष्ट्रातील 106 वर्षांच्या आजींची कोरोनावर मात; KDMC च्या कोविड हॉस्पिटलमधील आज डिस्चार्ज)

दुसऱ्या बाजूला कोरोनाचा मुंबईतील रुग्णांचा आकडा वाढत असल्याने कलम 144 येत्या 30 सप्टेंबर पर्यंत लागू करण्यात आलेला आहे. पण अन्य कोणत्याही नियमात पोलिसांकडून बदल करण्यात आला नसल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी त्रस्त होण्याची काहीच गरज नाही असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते. नागरिकांना वारंवार कोरोनापासून स्वत:सह परिवाराची काळजी घ्यायची असल्यास मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहन करण्यात येत आहे. (Mumbai Local Trains Update: सहकारी आणि खाजगी बँकांच्या 10% कर्मचाऱ्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची रेल्वे मंत्रालयाकडून परवानगी)

तसेच राज्यात अद्याप सिनेमागृ, नाट्यगृह, जलतरण तलाव, जिम बंद ठेवण्यात आले आहे. तसेच मेट्रो सेवा सुद्धा बंद आहे. पण लोकल सेवा सुरु केली असून यामधून फक्त अत्यावश्यक सेवासुविधांमधील कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. महाराष्ट्रासह देशात सुद्धा कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक असून तो आता 54 लाखांच्या पार गेला आहे. तसेच एकूण 86752 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.