राज्यातील सगळ्या बोर्डांच्या शाळेत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घोषणा केली आहे. येत्या 24 जूनला राज्यातील काही साहित्यिक हे आझाज मैदानावर आंदोलन करणार असून प्रत्येक शाळेत मराठी भाषा शिकवावी अशी मागणी करणार आहेत.
सीबीएससी आणि आयसीएसी शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही. त्यामुळे कायद्याअंतर्गत बदल करुन मराठी भाषा न शिकवल्यास त्या शाळेवर कारवाई करण्यात यावी असे फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच प्रत्येक बोर्डाच्या शाळेत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य असून ती शिकवावी असे सुद्धा मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे.
Maharashtra CM Devendra Fadnavis in Maharashtra Legislative Council: Marathi education is compulsory in Maharashtra. If need be, all necessary amendments will be done to achieve this objective pic.twitter.com/je1w9ov1od
— ANI (@ANI) June 20, 2019
तर मराठी शाळांचा दर्जा सुधारणे, मराठी भाषा भवन उभारणे, शालेय विद्यार्थ्यांवर वाचन संस्कार करणे असे विविध मुद्दे पावसाळी अधिवेशनात मंजुकरावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शिवसेनेच्या आमदार निलम गोऱ्हे यांनी मराठी भाषेबाबत मुद्दा उपस्थित केल्यानंतर देवेंद्र फडणीवस यांनी त्याबद्दल आदेश दिले आहेत.