World Suicide Prevention Day: भारतामध्ये तरुण लोक करतात सर्वाधिक आत्महत्या; मानसिक आरोग्यावरही लक्ष केंद्रित करणे गरजेचे- Expert

भारतात दरवर्षी 1,70,000 हून अधिक लोक आत्महत्येमुळे आपला जीव गमावतात, त्यामुळे देशातील आत्महत्या रोखण्यासाठी मानसिक आरोग्याच्या पलीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. 'द लॅन्सेट जर्नल'मध्ये मंगळवारी प्रकाशित झालेल्या एका नव्या अभ्यासात एका तज्ज्ञाने ही माहिती दिली आहे.

Representational Image | Pixabay

दरवर्षी 10 सप्टेंबर रोजी 'जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन' (World Suicide Prevention Day) साजरा केला जातो. आता आजच्या 'जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिना'च्या दिवशी एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. जगात सर्वाधिक आत्महत्या भारतीय तरुण करत असल्याचे अहवालात म्हटले आहे. एका अंदाजानुसार, भारतातील किशोरवयीन मुलांमध्ये (15-19 वर्षे) मृत्यूचे चौथे प्रमुख कारण आत्महत्या आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार, 40 टक्क्यांपेक्षा जास्त आत्महत्या 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांमध्ये होतात.

याबाबत मानसोपचार विभागाचे प्राध्यापक नंद कुमार म्हणाले, भारतात आत्महत्या करणाऱ्या तरुणांची संख्या खूप जास्त आहे. ही संख्या जागतिक सरासरीच्या जवळपास दुप्पट आहे. भारतात, जवळजवळ दररोज 160 तरुण आत्महत्या करतात. लोकांना आत्महत्या करण्यास भाग पाडण्याची अनेक कारणे आहेत, जसे की तणावपूर्ण कौटुंबिक वातावरण, अस्थिर भावनिक आरोग्य, ड्रग्जचे सेवन, परस्पर संबंधांमध्ये अपयश, मित्रांमधील खराब संबंध आणि एकटेपणा. (हेही वाचा: Rajasthan Shocker: पत्नीच्या रील्सवर येत होत्या अश्लील कमेंट्स; नाराज पतीने केली आत्महत्या, मृत्यूपूर्वी Live करत दिली माहिती)

मनोचिकित्सक डॉ श्याम भट म्हणाले, साधारण 15 ते 39 वर्षे वयोगटातील व्यक्तींमध्ये मृत्यूचे एक प्रमुख कारण आत्महत्या हे आहे, हे जागतिक स्तरावर आणि आपल्या देशात सर्वात गंभीर सार्वजनिक आरोग्य संकटांपैकी एक आहे. मानसिक आरोग्य संकटाचा सामना करण्यासाठी आणि आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम आणि किरण हेल्पलाइनसारख्या अनेक सेवा सुरू केल्या आहेत, मात्र तरीही आत्महत्येबाबत समोर आलेली आकडेवारी धक्कादायक आहे.

दरम्यान, पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया (PHFI) च्या सार्वजनिक आरोग्याच्या प्राध्यापिका डॉ राखी डंडोना यांनी सांगितले की, दुर्दैवाने, आत्महत्येला अजूनही गुन्हा म्हणून कलंकित केले गेले आहे, परंतु आत्महत्या ही प्रत्यक्षात एक जटिल सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. आत्महत्या रोखण्यासाठी आपल्याला मानसिक आरोग्याच्या पलीकडे पाहण्याची गरज आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now