Tulsi Vivah 2022: तुलसी विवाह महत्त्व, पूजा आणि इतर तपशील घ्या जाणून

हिंदू पंचांगानुसार, तुळशी विवाह दरवर्षी कार्तिक (Kartik) महिन्यातील शुक्ल पक्षाच्या (Shukla Paksha) बाराव्या दिवशी केला जातो. कार्तिकी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी तिथीलाही तुलसी विवाह (Tulsi Vivah 2022) केला जातो. हिंदू धर्मात तुळशीविवाहाला विशेष महत्त्व आहे. जाणून घेऊया या वर्षी तुळशी विवाह (Tulsi Marriage) कधी आहे आणि शुभ मुहूर्त.

Tulsi Vivah | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

दिवाळी (Diwali 2022) संपली की वेध लागतात ते तुलसी विवाहाचे. अनेक लोक असेही मानतात की वसुबारसेपासून सुरु झालेली दिवाळी तुलसी विवाहापर्यंत (Tulsi Vivah 2022 Date and Timing) चालते. हिंदू परंपरेत तुलसी विवाह महत्त्वाचा मानाला जातो. हिंदू पंचांगानुसार, तुळशी विवाह दरवर्षी कार्तिक (Kartik) महिन्यातील शुक्ल पक्षाच्या (Shukla Paksha) बाराव्या दिवशी केला जातो. कार्तिकी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी तिथीलाही तुलसी विवाह (Tulsi Vivah 2022) केला जातो. हिंदू धर्मात तुळशीविवाहाला विशेष महत्त्व आहे. जाणून घेऊया या वर्षी तुळशी विवाह (Tulsi Marriage) कधी आहे आणि शुभ मुहूर्त.

तुळसी विवाह 2022- तारीख आणि शुभ मुहूर्त: हिंदू पंचांगानुसार, कार्तिक महिन्याची शुक्ल द्वादशी तिथी 5 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:00 वाजता सुरू होईल आणि 6 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5:00 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार, 5 नोव्हेंबर 2022, शनिवारी तुळसी विवाहाची तारिख आहे. या दिवशी राहू काळ सोडून संपूर्ण दिवस तुलसी विवाह आणि पूजेसाठी शुभ आहे. 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:20 ते 10:42 असा 1.22 मिनीटांचा कालावधी राहूकाळ असल्याचे पंचागकर्ते आणि पंचागाचे अभ्यासक सांगतात. (हेही वाचा, Tulsi Vivah 2022 Dates: तुलसी विवाह यंदा कधी? इथे जाणून घ्या तारखा)

तुलसी विवाह पूजा विधी- तुळशी विवाहाच्या शुभ मुहूर्तावर घराच्या अंगणात ताटात तुळशीचे रोप ठेवावे. यानंतर तुळशीच्या भांड्यात ऊस लावून त्यावर लाल कापड किंवा चुनरीने मंडप सजवावा. त्यानंतर तुळशीच्या भांड्यात शालिग्राम दगड ठेवा. या दिवशी तुळशीचा विवाह शालिग्राम येथे केला जातो. त्यानंतर तुळशी आणि शाळीग्रामला हळदीचा तिलक लावावा. नंतर हळद दुधात भिजवून ती हळद ऊसाच्या मंडपावर लावावी. यानंतर सर्व पूजेमध्ये आवळा, सफरचंद, डाळिंब, पेरू इत्यादी सर्व हंगामी फळे अर्पण करावीत. त्यानंतर पूजेच्या थाळीत कापूर जाळून त्यासोबत तुळशी आणि शालिग्रामीची आरती करावी. यानंतर तुळशीची 11 परिक्रमा व प्रसाद वाटप करावे.

हिंदू धर्मात तुलसी विवाहाला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी मंदिरांमध्ये तुलसीविवाहाचे आयोजन केले जाते. शिवाय, ज्यांच्या घरी तुलसी आहेत त्यांच्याही घरी तुलसीविवाह आयोजित केले जातात. तुळसी विवाहासाठी पूजेचे विशेष असे नियम नाहीत. परंतू, सर्वसामान्यपणे विवाहात पाळले जाणारे नियम पूजेवेळी पाळले जातात. जसे की, तुलसी विवाहादिवशी घरातील लोक पहाटने लवकर उठतात. स्वच्छ अंघोळ करुन स्वच्छ कपडे परिधान करतात. घरातील देव्हाऱ्यातील देवांचे पूजन करतात. या दिवशी शक्यतो काळे कपडे परिधान केले जात नाहीत. महत्त्वाचे म्हणजे तुळशी विवाह करणारी व्यक्ती त्या दिवशी उपवास करते आणि व्रताचे नियम पाळते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement