Tulsi Vivah 2019: तुळशी विवाहाचा मुहूर्त, महत्त्व आणि कसा कराल तुळशी विवाह?
दिवाळीनंतर काही दिवसांत तुळशीच्या लग्नाची तयारी सुरू होते. कार्तिकी एकादशी नंतर म्हणजेच द्वादशीच्या मुहूर्तावर दिवशी तुळशीचा विवाह संपन्न होतो. यंदा तुळशी विवाहाचा मुहूर्त काय आहे, हे जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर लेख.
Tulsi Vivah Shubh Muhurt 2019 : दिवाळीनंतर काही दिवसांत तुळशीच्या लग्नाची तयारी सुरू होते. कार्तिकी एकादशी नंतर म्हणजेच द्वादशीच्या मुहूर्तावर दिवशी तुळशीचा विवाह (Tulsi Vivah) संपन्न होतो. तुळशीचा विवाह झाल्यानंतर लग्नाच्या मुहूर्तांनादेखील सुरूवात होते. दरम्यान चार महिन्यांच्या काळात देव निद्रा स्थितीत असतात. ते पुन्हा जागे होतात त्यास देवउठनी एकादशी असे म्हणतात. देवउठनी एकादशी पार पडल्यानंतरच सार्या शुभ मुहूर्तांना सुरूवात होते असे म्हटले जाते. यंदा तुळशी विवाह सोहळा 9 नोव्हेंबरला सुरू होणार असून 12 नोव्हेंबरला त्याची समाप्ती होणार आहे. तुळशी विवाहामध्ये वधूच्या रूपात तुळशीला सजवून तिचा विवाह शाळीग्राम दगडाशी लावण्याची प्रथा आहे. शाळीग्राम हा विष्णू असल्याचं समजत जातं. काही ठिकाणी घरातील लहान मुलाचा तुळशीसोबात विवाह लावला जातो. याकरिता तुळशीला वधूप्रमाणे सोळा श्रृंगारांनी सजवल जात आज आपण या लेखातून तुळशी विवाह करण्याचे महत्त्व, मुहूर्त आणि तुळशी विवाह कसा करावा यासंदर्भात माहिती जाणून घेऊयात.
तुळशी विवाह शुभ मुहूर्त - (Tulsi Vivah Muhurt 2019)
द्वादशी तिथी आरंभ: 8 नोव्हेंबर 2019 दुपारी 12:24 वाजल्यापासून
द्वादशी तिथी समाप्ती: 9 नोव्हेंबर 2019 दुपारी 02:39 वाजेपर्यंत
हेही वाचा - Tulsi Vivah 2019: वैवाहिक जीवनातील समस्या दूर करण्यासाठी तुळशी विवाहाच्या दिवशी करा ‘ही’ कामे
तुळशी विवाहाचं महत्त्व -
तुळशी विवाह हा हिंदूधर्मियांसाठी एक पवित्र सोहळा समजला जातो. कार्तिकी व्दादशीच्या मुहूर्तावर तुळस आणि विष्णूचा विवाह झाल्याची अख्यायिका आहे. ज्यांचा विवाह झाला आहे, अशा लोकांनी तुळशी विवाह करणं गरजेचं असतं. तुळशी विवाह केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांतता नांदते. तसेच धनलाभही होतो. विवाहित जोडप्याने तुळशी विवाह करणं खूप गरजेचं आहे. तुळशी विवाह केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते.
असं करा तुळशीचं लग्न -
तुळशीच्या रोपाची घरात रुजवणी केल्यानंतर सुमारे 3 वर्षांनी तिचा विवाह करण्याची पद्धत आहे. यानंतर तुळशीच्या विवाहादिवशी तुळशीला नववधूप्रमाणे नटवले जाते. त्यामध्ये आवळा, चिंच, बोरं, उसाची दांडी, हळकुंड आणि हिरव्या बांगड्या ठेवल्या जातात. घरात शाळीग्राम दगड असल्यास त्याच्यासोबत किंवा घरातील किशोरवयीन मुलासोबत मंगलाष्टाकाच्या घोषात तुळशी विवाह संपन्न होतो. यानंतर घरात गोडाधोडाच्या पदार्थाचे वाटप केले जाते.
हेही वाचा - Tulsi Vivah 2019: तुळशी पूजन करताना ‘या’ 5 गोष्टी केल्यास होईल भरपूर धनलाभ
पोथी-पुराणात सांगितलेल्या कथेनुसार, तुळस ही लक्ष्मीचे तर भगवान विष्णूने शाळीग्रामचे रुप धारण केले होते. असं म्हटलं जातं की, तुळशीचे लग्न लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते. म्हणजेच घरात धनधान्य, संपत्ती आणि इतर मालमत्ता वाढते. तुळशीचा आणि शाळीग्राम दगडाचा विवाह केल्याने कन्यादान केल्यासारखे पुण्य मिळते अशी समजूत आहे. त्यामुळे दांपत्यांच्या जीवनातील सुख, शांती समाधान वाढत राहावे याकरितादेखील तुळशीचं लग्न लावलं जातं.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)