Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथ यात्रेत किती रथ असतात? हे रथ कोण बनवते? जाणून घ्या संपूर्ण
जगन्नाथ रथयात्रा ही केवळ काही दिवसांची यात्रा नसते तर त्याची तयारी अनेक महिने चालते. रथयात्रेच्या तयारीत अनेक प्रकारचे कारागीर देखील सहभागी होतात.
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथ रथयात्रा 2025 (Jagannath Rath Yatra 2025) मध्ये 27 जूनपासून सुरू होत आहे. ही यात्रा जगन्नाथ मंदिरापासून सुरू होते आणि गुंडीचा मंदिरात जाते. भगवान जगन्नाथ वर्षातून एकदा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासोबत त्यांच्या मावशी गुंडीचाला भेटायला जातात. ही परंपरा रथयात्रेद्वारे पार पाडली जाते. दरवर्षी जगन्नाथ रथयात्रा आषाढ महिन्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच या वर्षी 27 जूनपासून सुरू होते.
जगन्नाथ रथयात्रा ही केवळ काही दिवसांची यात्रा नसते तर त्याची तयारी अनेक महिने चालते. रथयात्रेच्या तयारीत अनेक प्रकारचे कारागीर देखील सहभागी होतात. आज आम्ही तुम्हाला जगन्नाथ रथयात्रेत किती रथ असतात आणि ते कोण बनवतात याबद्दल माहिती देणार आहोत. (हेही वाचा - Shravan Special Jyotirlinga Air Tour Packages: मुंबई आणि पुण्याहून IRCTC चे श्रावण स्पेशल ज्योतिर्लिंग हवाई टूर पॅकेजेस; जाणून घ्या ठिकाणे, दर व इतर माहिती)
जगन्नाथ रथयात्रेतील रथ -
- बलभद्रचा तलध्वज रथ
- सुभद्राचा दर्पदलन रथ
- भगवान जगन्नाथाचा नंदीघोष रथ
जगन्नाथ रथयात्रेतील रथ कोण बांधतात?
जगन्नाथ रथयात्रेचे रथ एक-दोन नव्हे तर सात समाजातील लोक बनवतात. रथ बनवण्याची प्रक्रिया अक्षय्य तृतीयेपासून सुरू होते.
- विश्वकर्मा समुदाय - यांनाचं महाराणा असेही म्हणतात. या समुदायाचे लोक तीन रथांच्या आकार आणि रचनेकडे लक्ष देतात. रथाची उंची देखील ते ठरवतात.
- माळी समुदाय - हा समुदाय तीन रथांच्या सजावटीसाठी फुले, हार इत्यादी बनवतात.
- शिंपी समुदाय - तीन रथांचे कपडे या समुदायाद्वारे बनवले जातात. ते परमेश्वराचे कपडे तसेच रथाच्या इतर ठिकाणी वापरले जाणारे कपडे बनवतात.
- सुतार समुदाय - सर्व लाकडाचे काम सुतार समुदायाचे लोक करतात. हे लोक रथांच्या वेगवेगळ्या भागांमध्ये देखील सामील होतात.
- रंगारी समुदाय - हे लोक रथांवर रंगीत चित्रे आणि सजावटीचे साहित्य लावण्याची जबाबदारी घेतात.
- लोहार समुदाय - रथांवर वापरले जाणारे लोखंडी भाग या समुदायातील लोक बनवतात.
- कुंभार समुदाय - कुंभार तिन्ही रथांची चाके बनवतात.
या सात समुदायांव्यतिरिक्त, रथयात्रा यशस्वी करण्यासाठी इतर काही लोकांवरही जबाबदारी असते. असे मानले जाते की केवळ भगवान जगन्नाथाचे दर्शन घेतल्याने व्यक्तीच्या पूर्वजांना मोक्ष मिळतो.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)