Loksabha Elections 2019:'रमजान'च्या महिन्यात पहाटे 5 ला मतदान करण्याबाबत सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला विचारणा
Supreme Court | (File Photo)

देशभरात सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये (Loksabha Election)  मतदानाचे घटणारे प्रमाण आणि दिवसेंदिवस वाढत्या तापमानाचा पारा याचा संबंध लावत सुप्रीम कोर्टाने (Supreme Court Of India)  निवडणूक आयोगाला (election Commission) एक वेगळाच सल्ला दिला आहे. यानुसार उर्वरित तीन टप्प्यातील निवडणुकांमध्ये मतदानाची वेळ ही सकाळी 7 ऐवजी 5 वाजल्यापासून ठेवण्यात यावी अशी कल्पना मांडली आहे. पुढील काहीच दिवसात देशातील मुस्लिम बांधवांचे (Ramdaan) रमजान चे उपवास सुरु होतील या शिवाय राजस्थान (Rajasthan) सह भारतातील अन्य भागात उन्हाची वाढती झळ बघता दुपारच्या वेळेत लोक मतदानासाठी बाहेर पडत नाहीत असा अंदाज सुप्रीम कोर्टाने वर्तवला होता.  Lok Sabha Elections 2019 Fourth Phase Voting: लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यात देशात 64% मतदान, तर महाराष्ट्रात अंतिम टप्प्यात 57% मतदानाची नोंद

ANI ट्विट

यंदा 5 मे पासून मुस्लिमांचा प्रमुख सण म्हणजेच रमजान सुरु होणार आहे. रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधव पहाटे लवकर उठून अजान करतात व त्यानंतर खाऊन झोपी जातात, दिवसभर उपवास असल्याने ते उन्हात घराबाहेर पडत नाहीत. ही गोष्ट विचारात घेऊन 7 मे, 12 मे आणि 19 मे ला निवडणूक आयोगाने मतदान पहाटे पाचला सुरु करण्यात यावे अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने यासाठी योग्या पाऊल उचलावीत असे निर्देश निवडणूक आयोगाला दिले होते. तसंच मध्य भारतात वाढत्या तापमानामुळे लोकांना घर बाहेर पडायला त्रास होतो. तेव्हा त्यांचा विचार करूनही पहाटे पाचला मतदान सुरू करावे असंही या याचिकेत म्हंटल आहे.

इंडिया टुडेच्या माहितीनुसार रमजान च्या महिन्यात मतदानाची तारीख ठरावल्यावर या वादाला सुरवात झाली होती, मात्र निवडणूक आयोगाने, निवडणुकांच्या कालावधीत रमजानचा संपूर्ण महिना वगळता येणार नाही असे म्हणत, आपण मतदानाच्या तारखेसाठी रमजानचा मुख्य दिवस तसेच सर्व शुक्रवार वगळले आहेत असे स्पष्ट केले.