Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

COVID-19 Cases In India: गेल्या आठवड्यापासून भारतात कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या वाढत आहे. कोरोना विषाणूने पुन्हा डोकं वर काढल्याने आता आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात कोविड-19 च्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे, 31 मे पर्यंत देशात 3 हजारहून अधिक सक्रिय कोरोना रुग्णांची नोंद झाला. याशिवाय, चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची पुष्टी देखील आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. शनिवारपर्यंत भारतात 3395 सक्रिय कोविड-19 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

केरळमध्ये सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण -

केरळमध्ये सर्वाधिक 1336 सक्रिय कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळले. केरळनंतर महाराष्ट्र आणि दिल्ली कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्याचं दिसून आलं आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या राज्यांमध्ये केरळ, महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे. दरम्यान, कोरोना संसर्गाची तीव्रता कमी असून बहुतेक रुग्ण घरीच विलगीकरणात असल्याचे वृत्त आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही. आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असले तरी काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. (हेही वाचा - Covid-19 Deaths: ठाण्यात कोरोनाचा आणखी एक बळी! 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू, कर्नाटकमध्येही एकाचा मृत्यू; सक्रिय रुग्णांची संख्या 257 वर)

गेल्या 24 तासांत 4 मृत्यूची नोंद

गेल्या 244 तासांत, भारतात कोविड-संबंधित चार मृत्यूंची नोंद झाली आहे. यात दिल्ली, केरळ, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. त्याच वेळी, 1435 लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, जो तुलनेने उच्च बरे होण्याचा दर दर्शवितो.

महाराष्ट्रात, सक्रिय रुग्णांची संख्या 467 आहे. शनिवारी राज्यात 68 नवीन संसर्ग नोंदवले गेले, ज्यात मुंबईतील 30 आणि पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 15 रुग्णांचा समावेश आहे. कल्याण-डोंबिवली आणि रायगडमध्ये कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.