'भारताच्या पश्चिम आणि उत्तर सीमा अजून इतक्या सुरक्षित नाहीत की लोक शांतपणे झोपू शकतील'- RSS Chief Mohan Bhagwat
आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत (Photo Credits: PTI)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत शुक्रवारी गुजरातमधील अहमदाबाद येथे पोहोचले. येथे त्यांनी स्वयंसेवकांच्या एका कार्यक्रमाला संबोधित केले. 2025 मध्ये होणाऱ्या आरएसएसच्या शताब्दी सोहळ्यांच्या मालिकेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला समाजशक्ती संगम असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये सुमारे 15 हजार स्वयंसेवक सहभागी झाले होते. यावेळी बोलताना मोहन भागवत म्हणाले, 'भारत आर्थिकदृष्ट्या प्रगती करत आहे पण त्याच्या पश्चिम आणि उत्तर सीमा इतक्या सुरक्षित नाहीत की लोक शांतपणे झोपू शकतील.' (हेही वाचा: New Delhi: इंडोनेशियातील हॅकर्स भारत सरकारच्या वेबसाइट्सवर करत आहे हल्ला, सायबर-सुरक्षा तज्ञांनी चिंता केली व्यक्त)