Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख

तेलंगणा आपत्ती प्रतिसाद आणि अग्निशमन सेवा महासंचालक वाय नागी रेड्डी म्हणाले, प्राथमिक तपासणीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे दिसून आले आहे. सर्व 17 जणांच्या मृत्यूचे कारण धुरामुळे श्वास घेणे होते, कोणालाही भाजलेल्या जखमा झाल्या नाहीत. मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.

Fire प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य- Pixabay)

तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील (Hyderabad) ऐतिहासिक चारमिनार परिसरात असलेल्या प्रसिद्ध गुलजार हाऊस निवासी संकुलात, आज सकाळी भीषण आग (Fire) लागली. या घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून, आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगण्यात आले. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. मृतांमध्ये दोन मुले आणि चार महिलांचा समावेश आहे. रविवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास हैदराबादमधील चारमिनारकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या गुलजार हाऊसमध्ये अचानक भीषण आग लागली.

त्यानंतर याची माहिती पोलीस आणि अग्निशमन विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात आगीमुळे अनेक लोक भाजले. इमारतीत धूर पसरल्याने अनेक लोक बेशुद्ध पडले. अग्निशमन दल, डीआरएफ, जीएचएमसी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि इमारतीत अडकलेल्या अनेक लोकांना बाहेर काढले. मात्र, या काळात 17 जणांचा मृत्यू झाला.

11 अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या मदतीने अग्निशमन दलाच्या जवानांनी खूप प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणल्याचे वृत्त आहे. इमारतीला बोगद्यासारखा दोन मीटरचा फक्त एकच प्रवेशद्वार होता. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी एक मीटरचा फक्त एक जिना आहे. यामुळे पळून जाणे आणि बचाव कार्य खूप कठीण झाले. सकाळी 9 वाजेपर्यंत आग आटोक्यात आली होती. इमारतीत एकूण 21 लोक होते. तेलंगणा अग्निशमन आपत्ती प्रतिसाद आपत्कालीन आणि नागरी संरक्षणाने जाहीर केलेल्या 17 जणांच्या मृतांच्या यादीत 10 वर्षांखालील आठ मुलांची नावे आहेत. (हेही वाचा: Accident in Tamil Nadu: वलपराईजवळ बस 20 फूट खोल दरीत कोसळली, 40 हून अधिक जण जखमी)

Hyderabad Fire:

तेलंगणा आपत्ती प्रतिसाद आणि अग्निशमन सेवा महासंचालक वाय नागी रेड्डी म्हणाले, प्राथमिक तपासणीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे दिसून आले आहे. सर्व 17 जणांच्या मृत्यूचे कारण धुरामुळे श्वास घेणे होते, कोणालाही भाजलेल्या जखमा झाल्या नाहीत. मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि आगीच्या दुर्घटनेत अडकलेल्या कुटुंबांना वाचवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. आगीतील जीवितहानीमुळे पंतप्रधान मोदी यांनीही दुःख व्यक्त केले. पंतप्रधान कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये दिले जातील, जखमींना 50,000 रुपये दिले जातील.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement