भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुष्मा स्वराज यांचे काही वेळापूर्वी कार्डियाक अरेस्ट मुळे दिल्लीतील AIIMS रुग्णालयात निधन झाले आहे. आज 9 वाजल्यापासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व आरोग्यमंत्री हर्षवर्धन हे हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते. मागील काही महिन्यांपासून त्या किडनीच्या आजाराने त्रस्त होत्या, काहीच वर्षांपूर्वी त्यांचे किडनी रिप्लेसमेंटचे ऑपरेशन देखील झाले होते. आज अखेरीस त्यांनी वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.
ANI ट्विट
Former External Affairs Minister & senior BJP leader, Sushma Swaraj, passes away. pic.twitter.com/4L59O73xQU
— ANI (@ANI) August 6, 2019
सुषमा स्वराज यांनी अलीकडेच काश्मीर मधील कलम 370 हटवल्यावरून मोदी सरकारचे कौतुक करणारी एक ट्विट सुद्धा केले होते ज्यामध्ये त्यांनी हा ऐतिहासिक दिवस जिवंतपणी पाहता आल्याचा आनंद व्यक्त केला होता.
दरम्यान सुष्मा यांनी मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली 2014 ते 2019 या काळात परराष्ट्र मंत्री म्हणून महत्वाचे भूमिका बजावली होती. मात्र तब्येतीच्या कारणाने यंदाच्या मोदी सरकारमध्ये त्यांनी आपल्याला मंत्रीपद न देण्याची विनंती केली होती. मात्र आता त्यांची तब्येत आणखीनच गंभीर झाल्याचे समजत आहे.