All-Party Delegation on Terrorism: दहशतवादाविरोधात भारताचा स्पष्ट संदेश, 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळं जाणार विदेशात; पाहा कोणाकोणाचा समावेश
पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर भारत सरकार 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळं प्रमुख भागीदार राष्ट्रांमध्ये पाठवणार आहे. यामध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांचाही समावेश असून, दहशतवादाविरोधात भारताची शून्य सहनशीलतेची भूमिका जगासमोर मांडली जाणार आहे.
Cross-Border Terrorism: पहलगाम येथील दहशतवादी हल्ला (Pahalgam Terror Attack) आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक मोठा परराष्ट्र धोरणात्मक निर्णय घेतला (India Terrorism Stand) आहे. देशातील एकात्मतेचा आणि दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेचा संदेश जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी भारत 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळं (All-Party Delegation) परदेशात पाठवणार आहे. संसदीय कामकाज मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या शिष्टमंडळांचा उद्देश दहशतवादाच्या सर्व स्वरूपांविरुद्ध भारताची ठाम आणि एकमताने घेतलेली भूमिका जागतिक पातळीवर सादर करणे आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसह अनेक प्रमुख भागीदार देशांच्या भेटी या शिष्टमंडळांतर्गत घेतल्या जाणार आहेत.
संसदीय कामकाज मंत्रालयाने शनिवारी एक निवेदन जारी केले, ज्यामध्ये म्हटले आहे की, सर्वपक्षीय शिष्टमंडळे भारताची राष्ट्रीय सहमती आणि सर्व प्रकारच्या आणि प्रकटीकरणातील दहशतवादाचा सामना करण्यासाठी दृढ दृष्टिकोन मांडतील. ते जगभरातील दहशतवादाविरुद्ध भारताच्या शून्य सहिष्णुतेच्या धोरणाचा मजबूत संदेश देतील. (हेही वाचा, Omar Abdullah On Mehbooba Mufti: 'सीमेपलीकडील लोकांना खूश करण्याचा प्रयत्न'; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची मेहबूबा मुफ्तींवर टीका)
शिष्टमंडळांचं नेतृत्व करणारे प्रमुख नेते:
सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतून निवड करण्यात आलेल्या नेत्यांनी हे शिष्टमंडळ नेतृत्व करणार असून, हे सर्व नेते मुद्देसूद आणि स्पष्ट विचार व्यक्त करणारे म्हणून ओळखले जातात.
नेते | राजकीय पक्ष | आघाडी |
रविशंकर प्रसाद | भाजप | एनडीए |
बैजयंत पांडा | भाजप | एनडीए |
शशी थरूर | काँग्रेस | इंडिया आघाडी |
संजय झा | जनता दल (युनायटेड) | एनडीए |
कनिमोळी | द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) | इंडिया आघाडी |
सुप्रिया सुळे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) | इंडिया आघाडी |
श्रीकांत शिंदे | शिवसेना (शिंदे गट) | एनडीए |
वरील 7 नेत्यांपैकी 4 नेते एनडीएतून असून 3 नेते विरोधी INDIA आघाडीतून आहेत. प्रत्येक शिष्टमंडळ सुमारे 5 देशांना भेट देण्याची शक्यता आहे.
सरकारचे अधिकृत वक्तव्य:
-
- संसदीय कामकाज मंत्रालयाने म्हटलं आहे, सर्वपक्षीय शिष्टमंडळं दहशतवादाविरोधात भारताची ठाम भूमिका आणि राष्ट्रीय एकमताचे प्रतिनिधित्व करतील. भारताची शून्य सहनशीलतेची स्पष्ट भूमिका ही जगासमोर मांडतील.
- किरण रिजिजू यांची प्रतिक्रिया: संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सोशल मीडियावर म्हटलं आहे, संकटाच्या क्षणी भारत एकवटतो. 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळं लवकरच परदेशात जाणार असून, दहशतवादाविरोधातील आपला सामूहिक संदेश ते घेऊन जातील. राजकारणापलीकडे असलेली ही राष्ट्रीय एकात्मतेची ताकद आहे, असंही त्यांनी म्हटलं.
सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
- शशी थरूर यांचा प्रतिसाद: काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी सरकारच्या निमंत्रणाचा स्वीकार करताना म्हटलं, जेव्हा राष्ट्रहिताचा प्रश्न येतो आणि माझी गरज भासते, तेव्हा मी नेहमीच तयार असतो. जय हिंद!
भारताचं हे पाऊल केवळ परराष्ट्र धोरणातच नव्हे, तर दहशतवादाविरोधातील लढ्याबाबत जागतिक सहकार्य वाढवण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं ठरणार आहे. पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येऊन जागतिक व्यासपीठावर भारताची भूमिका ठामपणे मांडण्याचा हा एक ऐतिहासिक प्रयत्न आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)