Ajit Pawar On Shinde Govt: पेट्रोल-डिझेल दरावरुन अजित पवारांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल, ‘दोघंच अख्ख्या महाराष्ट्राचे मालक झालेत’
Ajit Pawar (Photo Credit - Twitter)

आज गुरुवारी राज्य मंत्रिमंडळची बैठक घेण्यात आली या बैठीकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहे. या बैठकीत नऊ निर्णय घेण्यात आले. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मोठी घोषणा करुन राज्याच्या जनतेला दिलासा दिला आहे. या  राज्यात पेट्रोलच्या दरात 5 तर डिझेलच्या दरात 3 रुपयांची कपात करण्यात आली आहे. या दरावरुन अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल करुन जाब विचारला आहे. पुण्यात (Pune) बोलत असताना अजित पवार म्हणाले महाविकास आघाडी सरकारकडे 50 टक्के करकपातीची मागणी करत होतात. आता सत्तेत आल्यानंतर तटपुंजी कपात का केली? असा सवाल विरोधी पक्षाते नेते अजित पवार यांनी पेट्रोल-डिझेल दरावरुन उपस्थित केला आहे.

आधी मला म्हणत होते पेट्रोल आणि डिझेलवरचा व्हॅट 50 टक्के कमी करा. मग आता त्यांनी का नाही 50 टक्के कमी केला? तसं केलं तर माझ्या माहितीप्रमाणे डिझेलचे दर 11 तर पेट्रोल 18 रुपयांनी स्वस्त होईल. सरकार बदलल्यानंतर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातो. पण यांनी काय केल नाही.  विरोधात असताना मागणी करायची, अन् निर्णय घेण्याची वेळ आल्यावर पळवाट काढायची अशी टीका अजित पवांरानी शिंदे सरकरावर केली आहे.

लोकांमधून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीच्या निर्णयाचा केला विरोध

लोकांमधून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीच्या निर्णयाचा समावेश युती सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हा निर्णय झाला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा निर्णय रद्द करण्यात आला. मात्र, आता पुन्हा एकदा शिंदे आणि फडणवीस यांनी सरपंच आणि नगराध्यक्षाची निवड थेट लोकांमधून करण्याचा निर्णय घेतलाय. पण, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवलाय आहे. हा निर्णय लोकशाहीला मारक असल्याची टीका अजित पवारांनी केली आहे. (हे देखील वाचा: Maharashtra Cabinet Decision: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वपूर्ण 9 निर्णय)

दोघंच अख्ख्या महाराष्ट्राचे सध्या मालक 

आपत्ती व्यवस्थापना विभागात अद्यापर्यंत संचालकही नेमलेला नाही. कित्येक वेळा आपल्याकडे पावसाळ्यात अनेकदा महापूर येतो, अनेकदा घरंदारं पडतात, काही ठिकाणी तलाव फुटतात किंवा दरडी कोसळलात. त्यावेळी मदत पुनर्वसन खात्याला पूर्णवेळ सचिव गरजेचा असतो. पण अजूनही पूर्णवेळ सचिव यांना देता आलेला नाही. हे एकप्रकारे त्यांचं अपयश आहे. वास्तविक दुसऱ्या कुठल्या मंत्र्याला विचारायचं काही कारण नाही, दोघंच अख्ख्या महाराष्ट्राचे सध्या मालक झाले आहेत. त्यामुळे कुणाला विचारायचं. असा खोचक टोलाही अजित पवार यांनी शिंदे आणि फडणवीसांना लगावलाय.