Ahmedabad Plane Crash | (Photo Credit- ANI)

Air India Flight AI171 News: अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Sardar Vallabhbhai Patel International Airport) गुरुवारी (12 जून) दुपारी उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणातच अपघातग्रस्त (Air India Flight Crash) झालेल्या एअर इंडिया AI171 विमानाबाबत एक धक्कादायक माहिती (Ahmedabad Plane Crash) समोर आली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) ने सांगितले की, पायलटने 'Mayday' आपत्कालीन कॉल दिला होता, परंतु ATC (Air Traffic Control) कडून त्यावर कोणताही प्रतिसाद पोहोचला नाही. ‘Mayday’ हा आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरला जाणारा आपत्कालीन रेडिओ सिग्नल असतो, जो कोणत्याही जीवनाला धोका असलेल्या स्थितीत वापरला जातो. लंडनच्या गॅटविक (Gatwick) या विमानतळाकडे निघालेल्या Boeing 787 विमानात एकूण 242 जण होते, ज्यात 230 प्रवासी, 2 पायलट आणि 10 क्रू मेंबर्स होते.

उड्डाणानंतर काहीच मिनीटांमध्ये अपघात

डीसीजीए (DGCA) च्या माहितीनुसार, विमानाने 1:39 PM वाजता धावपट्टीवरुन 23 वरून उड्डाण घेतले. काही मिनिटांनंतर एका 17 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये हे विमान नजीकच्या निवासी परिसरात कोसळताना दिसले. घटनास्थळावरून घनदाट काळ्या धुराचे लोट आकाशात झेपावताना दिसले. अद्याप कोणताही अधिकृत मृत्यू किंवा जखमींचा आकडा जाहीर करण्यात आलेला नाही. (हेही वाचा, Vijay Rupani: एअर इंडियाच्या AI171 विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी प्रवासी असल्याचे वृत्त)

एअर इंडियाकडून पुष्टी आणि हॉटलाइन क्रमांक

एअर इंडियाने आपल्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर पुष्टी केली आहे की, अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणारे विमान एआय 171 आज टेक ऑफनंतर अपघातात सापडले. अहमदाबादहून दुपारी 1.38 वाजता निघालेल्या या विमानात 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. त्यापैकी 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनेडियन नागरिक आणि 7 पोर्तुगीज नागरिक आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेले जात आहे. अधिक माहिती देण्यासाठी आम्ही 1800 5691 444 हा एक समर्पित प्रवासी हॉटलाइन क्रमांक देखील सुरू केला आहे. या घटनेची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना एअर इंडिया पूर्ण सहकार्य करत आहे. (हेही वाचा, Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद येथे Air India कंपनीचे विमान कोसळले; विमानातील प्रवाशांमध्ये राजकीय व्यक्तिमत्त्वांचा समावेश)

आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून, अपघाताचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी तपास सुरू आहे. DGCA आणि इतर विमानवाहतूक संस्था यावर सखोल तांत्रिक तपास करणार आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापु यांनी सांगितले की ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि सर्व विमान वाहतूक आणि आपत्कालीन प्रतिसाद संस्थांना जलद आणि समन्वित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. "माझे विचार आणि प्रार्थना विमानातील सर्व लोकांसोबत आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत," असे त्यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरी विमान वाहतूक मंत्र्यांशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.