
Coronavirus Cases in India: भारतात कोरोना विषाणू (Coronavirus) म्हणजेच कोविड-19 संसर्गाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. सोमवारी देशातील विविध राज्यांमध्ये कोरोना संसर्गाची एकूण प्रकरणे 1000 च्या पुढे गेली आहेत. आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या भारतात कोरोनाच्या एकूण प्रकरणांची संख्या 1009 आहे. त्यापैकी 752 प्रकरणे अलीकडेच नोंदवली गेली आहेत. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती काय आहे ते जाणून घेऊयात.
केरळमध्ये आढळले सर्वाधिक प्रकरणे -
भारतात सर्वाधिक कोरोना संसर्गाचे रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत. येथे सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 430 आहे. यानंतर, महाराष्ट्रात कोरोनाचे 209 सक्रिय रुग्ण, दिल्लीत 104 सक्रिय रुग्ण आणि कर्नाटकात 47 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. अंदमान आणि निकोबार, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीर सारख्या काही राज्यांमध्ये सध्या कोरोना संसर्गाचे कोणतेही सक्रिय प्रकरण नोंदवलेले नाही. (हेही वाचा - Child Dies After Eating Jelly: धक्कादायक! जेली घशात अडकल्याने दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू)
कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण 31 डिसेंबर 2019 रोजी सापडला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जानेवारी 2020 मध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी घोषित केले. त्यानंतर, 11 मार्च 2020 रोजी कोरोनाला साथीचा रोग घोषित करण्यात आला. कोरोना रुग्णांमध्ये वाढ लक्षात घेता, 24 मार्च 2020 रोजी देशभरात 21 दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. (हेही वाचा -पावसाच्या पाण्यात वाहून जाणार्या पीकाला वाचवताना हताश झालेल्या वाशिमच्या शेतकर्याचा व्हिडिओ वायरल; केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिले मदतीचे आश्वासन)
त्यानंतर लॉकडाऊन अनेक टप्प्यात वाढवण्यात आला. कोरोना साथीच्या काळात, भारतात सुमारे 68 दिवस पूर्ण लॉकडाऊन होता. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने 100 हून अधिक देशांनी लॉकडाऊन लादला. अनेक देशांनी पूर्ण लॉकडाऊन लागू केला तर अनेकांनी अंशतः लॉकडाऊन लागू केला.