महात्मा गांधी यांचा स्वातंत्र लढा नाटकी होता; भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांचे आक्षेपार्ह विधान

महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी आमरण उपोषण आणि सत्याग्रह करून भारताला स्वातंत्र मिळून दिले होते. मात्र, माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांनी महात्मा गांधी (Anantkumar Hegde) यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करून नव्या वादाला आमंत्रण दिले आहे.  महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहामुळे इंग्रजांनी देश सोडला नव्हता, तर निराशेतून देश सोडला होता. तसेच महात्मा गांधींनी जी काही अंदोलन आणि उपोषण केली आहेत. हे सर्व नाटकच होते, असे विधान अनंतकुमार हेगडे यांनी केले आहे. अनंतकुमार हेडगे यांच्या विधानामुळे राजकारण पेटण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अनंतकुमार हेगडे हे उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. नुकतीच बंगळरू येथील एका कार्यक्रमात अनंतकुमार यांनी महात्मा गांधी यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केले आहे. दरम्यान ते म्हणाले होते की, महात्मा गांधीचा स्वातंत्र लढा हा ब्रिटीश सरकारच्या संमती आणि पाठिंब्याने रचला गेला होता. या तथागतीत नेत्यांनी एकादाही पोलिसांचा मार खाल्ला नव्हता. ही खरी लढाई नव्हती. हा परस्पर संगनमताने रचलेला स्वातंत्र लढा होता, असे अनंतकुमार हेगडे म्हणाले आहेत. एवढेच नव्हे तर, महात्मा गांधींनी जी काही आंदोलने, उपोषणे करायची ही नाटकच होती. असेही अनंतकुमार म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Budget 2020: केंद्रीय अर्थसंकल्पावर शरद पवार यांची प्रतिक्रिया; शेतकऱ्यांचं हित हे अजूनही दूरचं स्वप्न म्हणत केलं 'हे' ट्विट

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान करून वाद निर्माण केला होता. त्यानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्यात चांगलीच जुंपली होती. दरम्यान, काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली होती. सध्या हा वाद शमला आहे. मात्र, अनंतकुमार यांनी केलेल्या विधानमुळे पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.